Saturday, December 18, 2010
काही निवडक चारोळ्या..!!
गोड बोलले म्हणजे प्रेम होत नाही
छान म्हंटले म्हणजे जीव जडत नाही
पण गोड म्हणून होणाऱ्या प्रेमाचा
छान गोडवा जीवनातून कधी जात नाही
आहे मी प्रेमात अस मी कधी म्हंटल
आवडते मला कुणी हे मी कधी म्हंटल
पण नाहीच आहे कुणी माझ आपल
हे हि मी कधी नाकारलं..:)
तू आहेस म्हणून मी आहे
दुखी जीवनात आनद आहे
जरी असेल आपल्यात दुरावा
जीवनात माझ्या तुझाच गोडवा
बघून तूला जीव प्रेमात पडला
प्रेमाचा छंद तुझ्या मूळे जडला
आनंदाशी मिलाप तुझ्या मूळे घडला
जीवनाला रंग तुझ्या मूळे चढला..
आठवणीने जीव व्याकूळला
दुराव्याने हा कळवळला
आज हा चेहरा हि झाकोळला
तुझ्या विना जीव तळमळला
सगळ जवळ असून आज
काही हरवल्यासारख वाटत
तुझ्या विना हे सार जग
हिरमुसल्या सारख वाटत
तुझ्या विना झाले
जीवन सुने सुने
सारे जवळ असून
वाटे उणे उणे
-- स्नेहल
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment