Friday, December 17, 2010

आठवणी...




सांजवेळी निवांत क्षणी मावळत्या सूर्याला न्याहाळताना
आठवली ती सारी माणस जी सोडून गेली ह्या जीवनाला

भावनेच्या आवेशात अश्रूंच्या आवेगात चित्ती त्यांना स्मरताना
आठवतात ते सारे दिवस होते जवळ ते असताना

मावळत्या सूर्याप्रमाणे हि लोक हि सारी मावळत गेली
सूर्य तर पुन्हा उगवला पण ती लोक कधीच नाही दिसली

आज सगळ असून त्यांची उणीव खूप भासते
सर्व जवळ असून हि मन त्यांच्यासाठी तरसते

न होती कसली अपेक्षा होती फक्त त्यांच्या प्रेमाची आस
ते इतक दिल कि त्या प्रेमाचा आज हि होतो क्षणोक्षणी भास

आठवून त्यांना आज अश्रूना हि मोकळी मिळते वाट
ते चेहरे आठवून मनी रोज येते आकांताची लाट

नसेल का आली त्यांना थोडीपण आमची कीव
कसा सोडून दिला असेल त्यांनी आम्हाशिवाय तो जीव

कळवळूनी हाक मारुनी वाटते त्या सर्वाना परत बोलवावे
देवा कृपा करून आम्हासाठी त्या जीवाना पुन्हा इथे हलवावे

-- स्नेहल

No comments:

Post a Comment