काळाच्या ओघात
माणस हरवतात
आठवणीच्या झरोक्यातून
हळूच डोकावतात
मनाच्या कप्प्यात
तीच वसतात
नजरेला दिसत नाहीत
पण अश्रुनी ओलावतात
क्षण हि त्यांच्याविना
युगांप्रमाणे भासतात
दु:ख अन वेदना
सोबतच चालतात
त्या जीवांना बिलगण्यासाठी
जीव कासावीस होतो
जुने क्षण ओंजळीत आणण्याचा
केविलवाणा प्रयत्न होतो
--स्नेहल
No comments:
Post a Comment